" बुद्धिप्रामाण्य, शील, करुणा, मैत्री आणि सर्वसामान्यांचे हित, सुख या संकल्पनावर आधारलेला निरीश्वरवादी धम्म बुद्धाने स्थापन केला जो माणसामाणसातल्या सदाचारावर भर देतो. बुद्धाचे समग्र तत्त्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभे आहे. समाजातील सर्व घटकांना आपले वाटणारे हे तत्त्वज्ञान खर्या अर्थाने लोकशाहीवादी आहे. वर्तमान काळातील सार्वत्रिक प्रश्न आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बुद्ध तत्त्वज्ञान ही काळाची अनिवार्य गरज आहे. माणसातील हिंस्रता, क्रूरता अधिक तीव्र होत आहे. नैराश्य, भय त्याची पाठ सोडत नाहीत. विविध स्वरूपांच्या भौतिक, मानसिक महात्त्वाकांक्षानी तो पछाडला गेला आहे. त्याचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्वास्थ्यही दुरावले आहे. अशावेळी अहिंसेचे प्रेषित असलेल्या गौतम बुद्धाचे विचार जागतिक शांततेसाठी एक महत्त्वाचा मार्ग ठरू शकतात. मानवजातीच्या विकासाचा, कल्याणाचा मार्ग या विचारातच सामावलेला आहे.
Discover the timeless wisdom of Gautama Buddha and his teachings on compassion, social justice, morality, and peace that continue to guide humanity in the modern world."


